Saturday 7 May 2016

माझी आई

          

          आज ही ती मला 'बाळ' म्हणूनच हाक मारते ..ते म्हणतात ना मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी ती तिची बाळचं असतात , तसाच हा तिचा अनुक्रम ..शाळेपासून ते आता ऑफिस पर्यंत ती मला जेवणाचा डब्बा बनवून देते ..तिला कितीही सांगितलं की कॅन्टीनमध्ये मिळतं गं चांगलं जेवण तरी ती ऐकत नाही , " काय रे ते सोडा टाकलेलं जेवण आवडतं तूला ? " अशी रागावते ..मग मला कधी पहाटे लवकर जायचे असेल कामावर तर माझ्या सोबतच उठते खास डब्बा बनवण्यासाठी ..ह्या तिच्या अश्या लाडामुळे साहजिकच माझ्या दोन्ही मोठ्या बहिणी तिला " तू फक्त त्याचीच आई आहेस " अशी तक्रार करतात ..तिच्याकडे असा दुजाभाव नाही आहे .. आईसाठी तिची सर्व लेकरे सारखीच असतात ..पण  हे जरी असे असले तरी मी तिचा सर्वात लाडका होतो आणि अजून ही आहे हे मात्र तेवढेच खरे ...
          घरात सर्वात लहान असल्यामुळे माझे सर्वात जास्त लाड झालेत ..सर्व साधारण मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाल्यामुळे मी ही कधी फार मोठ मोठे हट्ट नाही केलेत तिच्याकडे ..पण आठवतं शाळेत प्रथम क्रमांक आल्यावर ती मला नेहमी एखादा Game घेवून द्यायची आणि एकदा scholarship मिळाल्यावर मी तिला video game घेवून देण्यासाठी केलेला हट्ट जो तिने त्या काळात सर्वात महागडा video game विकत घेऊन देऊन पूर्ण केला होता ..लहान असतानाचा एक वाढदिवस आठवतो , पूर्ण दिवसभर हिरमुसलेलो होतो मी काही कारणामुळे .. मग अचानक संध्याकाळी आइने नवीन टी-शर्ट आणला माझ्यासाठी ..कसला खुश झालो होतो ... मी शाळेत असताना माझा वाढदिवस ही ती खूप वेगळ्या पद्धतीने साजरा करायची ... मला मंदिरात घेऊन जायची आणि मग मंदिरा बाहेर बसणाऱ्या गरीबांना भाजी-पोळी , बटाटा वडा , लाडू इत्यादि असे खाण्याचे पदार्थ माझ्या हातून द्यायची ...
७वीत असताना मित्रांसोबत एरियामध्ये ३१ डिसेंबरची पार्टी आठवते .. १०० ₹ कॉन्ट्रिब्यूशन होतं ... बहिणींचा सरळ सरळ विरोध होता " कसल्या पार्ट्या करतोय, कुठे ही पाठवू नकोस आई ह्याला " ..आई ही त्यांच्याशी सहमत वाटली , मग मला नाराज झलेले पाहुन तिने मला किचनमधुन साखरेच्या बरणीमधून थोड़ी साखर आणून दे असे सांगितले , बरणी उघडून पाहिले तर आतमध्ये एक कोरी करकारीत १०० ची नोट माझी वाट पाहत होती ...आईने दुरुनचं मला शांत राहण्याची खूण केली ..आज हज़ारो रुपय खर्च करून ही त्या दिवशी केलेल्या पार्टीतली धमाल पुन्हा अनुभवायला नाही मिळाली ..  शाळेतील सहल म्हटलं की आईकडूनच परवानगी आणि सहलीची फीस मिळवायची ..
          जस जसा मोठा होत गेलो तस तसा तिच्या मनाच्या मोठेपणाचा अंदाजा येऊ लागला ... फक्त अंदाजा , कारण त्याचा पूर्ण ठाव कोणालाच घेता नाही येणार ..स्वतः देवाला ही नाही...ह्या जगाच्या पाठीवर तुमची आईच एक अशी व्यक्ति असते जी तुमच्यावर लाभेवीण प्रीति करत असते , तिच्या प्रेमाची पुसटशी तुलना ही कोणा सोबत होऊ शकत नाही ... आणि तिने केलेल्या तुमच्यावर प्रेमाची भरपाई वगैरे लांबच राहू द्या तुम्ही केलेली नुसती तिच्या प्रेमाची जाणीव देखील तिला सुखावून जाते .. मूर्तिमंत त्याग म्हणजे आई ..
          आज Mother's Day च्या निमित्ताने ह्या सर्व लहान-सहान आठवणींची उजाळणी करण्याचे ठरवले ...
माउली तुला कोटी कोटी प्रणाम ....

- हर्ष पवार

Wednesday 23 December 2015

अवधूतचिंतन श्रीगुरुदेव दत्त !!!



अवघ्या विश्वावर तुझीच सत्ता 
घे जवळी मज गुरुदेव दत्ता 
स्मर्तुगामी कृपा करी आता
आहे तुझाच आसरा अवधूता  !


शुभ व शुभ्र प्रकाश तू दत्तात्रेया
परमातम्याची जणू तू निर्मल काया
अवतरला भूलोकी तू आली आमुची दया
आता नाही उरले कारण कोणा भया !!


दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त 
म्हणा मुखी आता फक्त 
करेल जो मन दत्ताशी आसक्त 
धन्य होणार तोची एक भक्त !!!


~ हर्ष पवार

Thursday 20 August 2015

सूर तेच छेडिता .....

गिटार हे एक असे वाद्य आहे ज्याचे आकर्षण प्रत्येकालाच असते.बहुतेक सर्वांच्याच मनात कधी तरी आपण ही गिटार वाजवायला शिकावे हा विचार आलेला असतो. हिंदी सिनेमामध्ये तर गिटारला वेगळेच स्थान आहे. सिनेमामधील नायकाचे सर्वात आवडते वाद्य म्हणजे गिटार.गिटार म्हटल की आठवतो हातात गिटार घेऊन नायीकेच्या अवती-भवती "बार बार देखो हजार बार देखो" गाणारा शम्मी कपूर किंवा आठवतो नायीकेच्या अतीव सौंदर्याचे गिटार वाजवत "चेहरा हे या चाँद खिला हे" गाणारा ऋषी कपूर किंवा अगदी नजीकच्या काळातील सलमान खान आठवतो विदाउट शर्ट गिटार घेऊन "ओ ओ जाने जाना ढूंढे  तुझे दिवाना" गाताना. गिटारची लोकप्रियता वाढवण्यामध्ये हिंदी सिनेमाचे ही मोठे योगदान आहे असे म्हटले तर चुकीचे नाही.

Friday 14 August 2015

पसंद हे मुझे



पसंद हे मुझे यहाँ की भीड़
त्योहारों का शोरगुल,
उड़ते हुए रंग ,
आसमा को चूमते पटाखे,
और यहाँ के गीत !

रास आता हे मुझे यहाँ का मौसम,
हल्की बरसातें ,
कभी कड़ी धुप,
तो कभी गुलाबी थंड !

भाते हे सपनो के पीछे दौड़ने वाले लोग
और वो जो सिर्फ करते है नोक-झोक !

यहाँ आम के आम और गुठलियों के भी दाम है
कभी ना रुकने वाले रेल को मेरा सलाम है !

मजे लेता हु सुन के यहाँ की नारेबाजी
भ्रष्ट नेताओं की सुन के बकरबाजी !

यहाँ तो हे पूरी की पूरी दाल काली
पुलिस से हाथ मिलाये हे यहाँ मवाली !

तमाम खामियों के बावजूद मुझे इस देश से हे प्यार
चढ़ा नशा इस देश का ऐसे की उतरता ही नहीं यार !
मुस्कुराते हुए वो ३ सरफिरे चढ़े ते फासी
बड़ी मुश्किल से आज़ादी की दुल्हन हुई थी राजी !!!
जय हिन्द !!!

~ हर्ष पवार

Tuesday 7 July 2015

ऐक ना जरा…….


फ़क्त तू ,मी आणि शांत समुद्र किनारा 
अशी एक संध्याकाळ तूला आवडेल का ..


मनातील हळव्या भावना मी व्यक्त न करता
अचुकपणे ओळखायला तूला जमेल का


वाट चुकलो मी अनेकदा इथे जीवनात
माझ्या हृदयाचा ठाव तूला तरी नीट कळेल का


आणेन ही मी तो चंद्र आणि ते तारे तुझ्या पदरात
पण त्यांची जपणूक तूला परवडेल का


काही पत्र पाठवली आहे मी पावसा सोबत
माझ्या आसवांची भाषा तूला कळेल का ......


मी आहे तोवर सर्व ठिक आहे मी गेल्यावर
तुझे माझ्यावाचून काही कधी अडेल का ?


~ हर्ष

Wednesday 17 June 2015

तेरे आने से

ऐसा नहीं के तेरे आने से पहले मेरे आसमान में सितारे नहीं थे 
बस तेरे आने के बाद अब वो टिम टिमाने लगे हैं !

खुशियाँ तो मेरे ज़िंदगी में पहले भी थी 
लेकिन अब मुस्कुराने की एक वजह मिल गई हैं !

मंजिल का पता तो मुझे पहले भी था
पर अब मंजिल तक पोहोचने की राह मिल गई हैं !

मेरी साँसों का सिलसिला तो कब से शुरू था
पर अब जा के मेरे जान में जान आ गई हैं !

अब धुप में तेरे जुल्फों की छाव मिल गई हैं
बारिश में तेरे सपनो की नाव मिल गई हैं !

माँगा तो पहले भी था बोहोत कुछ मैंने खुदा से
पर लगता हैं अब जा के मेरी दुआ रंग लाई हैं !!!

~ हर्ष 


Friday 10 April 2015

रक्तदान..... काळाची गरज!!!


पुढे येणारा काळ कसा असणार आहे हे आपण कोणीच सांगू शकत नाही … महागाई वाढत चालली आहे … पेट्रोल डीझलचे भाव दर महिन्याला वाढत चालले आहेत … जागतिक मंदी येत चालली आहे … पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढू लागली आहे … हे सगळ असच चालत राहिल तर तिसर महायुद्ध दूर नाही!!! … समजा येणा-या काळात तिसर महायुद्ध झालं आणि त्यात भारताला ही अनेक देशांशी युद्ध करावं लागलं … देशाची फार मोठया प्रमाणावर हानी झाली आहे …युद्ध संपलं आहे…देश हळू हळू पूर्णपणे स्थिर होत आहे …जन-जीवन पुन्हा सुरळीत होत आहे पण नेमकं झालं काय आहे तर तिसर्‍या महायुद्धात देशासाठी लढणा-या सैनिकांसाठी पुरवल्या गेलेल्या रक्ता मुळे , देशातल्या blood banks मध्ये रक्तच उरलं नाही आहे …तिसर्‍या महायुद्धात जगातील बहुतेक सर्वच देशांचा सहभाग असल्यामुळे कोणता ही देश एकमेकांना रक्ताच्या bottles विकत ही देत नाही आहे …. अश्या भारताचे चित्र तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे ….साल २०५० चालू आहे :