त्या दिवशी तसा ऑफिसमधून निघायला उशीरच झाला होता..शेवटच्या क्षणापर्यंत
काम संपतच नव्हतं... खाली थांबलेल्या कंपनी Cab ड्रायवरचा ही दोन वेळा फोन
येऊन गेला होता. त्याला ५ मिनीट आणखी थांब अशी request केली होती..
ड्रायवरचा तिसऱ्यांदा call येत होता.. शेवटी वैतागून PC shut down करून,
bag pack करून लिफ्टच्या दिशेने पळालो. खाली आलो आणि धावत जाऊन Cabमध्ये
बसलो. ड्रायवरला sorry म्हणालो उशीर झाल्या बद्दल …त्याने "ठीक आहे साहेब " असे म्हणत गाडी स्टार्ट केली .. Cabमध्ये बसताच सवयीप्रमाणे bagच्या
पहिल्या कप्प्यामधून हेडफोन बाहेर काढला. कधी नाही ते हेडफोनच्या वायर्सचा
गुंता झाला होता. सुटता सुटत नव्हता.. एका क्षणाला विचार आला गेल्या काही
दिवसांपासून आयुष्यात ही असाच प्रश्नांचा गुंता झाला आहे.. प्रत्येक गोष्ट
मनाविरुद्ध घडत आहे. प्रत्येक अंदाज चुकत आहे.. क्षणार्धात भानावर आलो आणि
कसाबसा वायर्सचा गुंता सोडवला.. हेडफोनची पिन मोबाइलमधे प्लग केली आणि
हेडफोन कानाला लावला .पण त्या दिवशी चित्त ठिकाण्यावर नव्हतं. त्यामुळे
कोणतं ही गाणं अगदी 10 सेकंदाहून जास्त लक्ष्य केंद्रित करून घेऊ शकत
नव्हतं. मनात असंख्य विचारांचे काहुर माजलेले होते. माझ्या PLAYLISTमधील
गाणी मी सतत shuffle करत बसलो होतो.. mood change करण्याचा माझा हा प्रयास
असफल ठरत होता . शेवटी 15-20 मिनिटानंतर एका गाण्याचे सुरुवातीचे शब्द
मनाला आकर्षित करते झाले :
क्या करे जिंदगी
इसको हम जो मिले
इसकी जान खा गए
रात दिन के गिले ....
क्या करे जिंदगी
इसको हम जो मिले
इसकी जान खा गए
रात दिन के गिले ....

