Tuesday 7 July 2015

ऐक ना जरा…….


फ़क्त तू ,मी आणि शांत समुद्र किनारा 
अशी एक संध्याकाळ तूला आवडेल का ..


मनातील हळव्या भावना मी व्यक्त न करता
अचुकपणे ओळखायला तूला जमेल का


वाट चुकलो मी अनेकदा इथे जीवनात
माझ्या हृदयाचा ठाव तूला तरी नीट कळेल का


आणेन ही मी तो चंद्र आणि ते तारे तुझ्या पदरात
पण त्यांची जपणूक तूला परवडेल का


काही पत्र पाठवली आहे मी पावसा सोबत
माझ्या आसवांची भाषा तूला कळेल का ......


मी आहे तोवर सर्व ठिक आहे मी गेल्यावर
तुझे माझ्यावाचून काही कधी अडेल का ?


~ हर्ष

1 comments:

  1. हर्ष... प्रेमामध्ये मशगूल दोन जीवांच्या काळजात ऊठणारे भावनांचे तरंग अचूक टिपले आहेत आणि तितक्याच रेशमी बंधात गुंफले आहे आपण. खूप सुंदर मनाचा ठाव घेणारी कविता !!!

    ReplyDelete